Mar, 13 2026

जन्माष्टमीला देशात 25 हजार कोटींची उलाढाल


Image Source By : Digital Satta

सीएआयटी'चे अध्यक्ष बी.सी. भरतीया यांची माहिती नागपूर, 27 ऑगस्ट : देशात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने तब्बल 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (सीएआयटी) अध्यक्ष बाळकृष्ण उपाख्य बी.सी. भरतीया यांनी दिली. देशभरात मोठ्या उत्साहात जन्माष्टमी साजरी झाली. यानिमित्ताने बाजारात झालेल्या उलाढालीचे आकडे सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल आणि अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी एकत्रित केले. जन्माष्टमीच्या निमित्ताने देशभरात फुले, फळे, मिठाई, देवता वेशभूषा, सजावटीच्या वस्तू, उपवासाच्या मिठाई, सुका मेवा, दूध, दही, लोणी आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. यासंदर्भात बी.सी. भरतीया यांनी सांगितले की, उत्तर आणि पश्चिम भारतात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरे आकर्षकपणे सजवण्यात आली होती. बाजारात ग्राहकांची गर्दी लक्षणीय होती. त्यांनी विशेष आकर्षणे जसे की डिजिटल टॅबॉक्स, भगवान कृष्णासोबत सेल्फी पॉइंट्स आणि इतर आनंददायक प्रदर्शनांवर प्रकाश टाकला. शहरांमध्ये संत-मुनींची असंख्य भजने, धार्मिक नृत्ये आणि प्रवचने झाली. विविध सामाजिक संस्थांनीही मोठ्या प्रमाणात जन्माष्टमी साजरी केली.या महिन्याच्या सुरुवातीला, सीएआयटीने राखी पौर्णिमेच्या वेळी देशभरात सणासुदीच्या व्यापाराचा अंदाज 12 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होता. आता जन्माष्टमीला बाजाराची उलाढाल 25 हजार कोटींपर्यंत पोहचल्याचा दावा आहे. एकंदर भारतीय सण, उत्सव आणि धार्मिक सोहळे यातून बाजारात मोठी उलाढाल होत असून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत असल्याचे सीएआयटीने अधोरेखित केले आहे.

ad